Ad Code

Responsive Advertisement

किसान क्रेडिट कार्ड चे फायदे


प्रमुख फायदे....


● शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, कीटकनाशके आदी शेतीच्या कच्च्या मालाच्या खरेदीसाठी कर्ज दिले जाते. • शेतीसोबतच पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन आदी


जोडधंदे करणारे शेतकरीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. कोणत्याही वेळी ठराविक कालवधीसाठी कर्ज मिळते.


• एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण मिळू शकते. • किसान क्रेडिट कार्ड हे एटीएममध्ये वापरता येते. यामुळे हवी


तेव्हा रक्कम काढता येते, तेही आपल्या सवडीनुसार. • हवी तेवढीच रक्कम गरजेनुसार काढल्याने, काढलेल्या रकमेनुसार व्याजाची आकारणी होते व त्यामुळे कमी व्याज भरावे लागते.


• रु. २५,००० पेक्षा जास्त पतमर्यादा असल्यास चेकबुकसुद्धा


मिळू शकते.


• प्रत्येक पिकावेळी कर्जाकरिता अर्ज करण्याची गरज भासत नाही..


• तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी प्रक्रिया शुल्क (प्रोसेसिंग चार्जेस) आकारले जात नाही.


• कार्डधारक वैयक्तिक खर्चासाठीही या कार्डचा वापर करू शकतो.


• शेतीच्या म्हणजेच पिकांच्या उत्पन्नावर, तसेच लागवडीखालील क्षेत्रावर आधारित कर्जाची मर्यादा ठरवली जाते..


• कर्जाची परतफेड पिकाच्या हंगामानुसार शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून करायची असते. अतिवृष्टी/ दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती काळात कर्जाची पुनर्रचना (रिशेड्युल्ड) केली जाते.


• किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले, तर त्याला ५० हजार रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते.


• कार्डची वैधता पाच वर्षे असते.



धन्यवाद 🙏

Post a Comment

0 Comments